Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्या सभापती जालिंधर बुधवत यांचे व्यापाऱ्यांना आवाहन

Spread the love


बुलढाणा- आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी-मायबाप शेतकऱ्यांसमोर अस्मानी संकटाची मालिका सुरू आहे. खरीप कसाबसा निभावला असला तरीही काबाडकष्ट करुन पिकवलेल्या मालाला योग्य भाव शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे व्यापारी बांधवांनी देखील शेतकऱ्यांना रास्त भाव द्यावा. शेतकऱ्यांनी देखील बाजार समितीमध्येच आपला शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन सभापती जालिंदर बुधवत यांनी केले आहे.
बुलडाणा कृ.उ.बा. समिती येथे आज २०/१०/२०२३ रोजी सभापती जालिंधर बुधवत यांच्या अध्यक्षतेखाली व्यापाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त भाव द्यावा, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारे अनुदान यासाठी त्यांना मालाच्या हिशोब पट्ट्या कच्च्या देऊ नये, हिशोब पट्ट्या पक्क्या स्वरूपाच्या सायला हव्या, शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे त्वरित द्यावे, मालाचा काटा हा अडत्यांनी व्यवस्थित करून घ्यावा तसेच हमालांना खूपशी काढू देऊ नये अशा प्रकारच्या सुचना यावेळी सभापती जालिंधर बुधवत यांनी
व्यापाऱ्यांना दिल्या. शेतकऱ्यांनी देखील थोड्याफार अमिषाच्या संदर्भामध्ये जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नये तसेच काही ठिकाणी अधिकृत व्यापारी नसताना त्यांना माल देण्यात येतो, याची कुठलीही हिशोबट्टी शेतकऱ्यांना जवळ नसते. त्यामुळे कोट्यावधीचा चुना लावून फरार झालेली अनेक उदाहरणं समोर आलेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेला माल हा बाजार समितीमध्येच विक्रीसाठी आणावा असे आवाहन सुद्धा याप्रसंगी त्यांनी केले.
यावेळी संचालक लखन गाडेकर, सुनील सोनुने, संजय दर्डा, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जिनेंद्र दर्डा, व्यापारी गौतम बेगाणी, विठ्ठल येवले, विजय अडसूळ, नितेश मानमोडे, धनंजय मुरकुटे, किशोरकुमार गणोरकर, नंदकिशोर सावजी, शरद व्यवहारे, पाचरणे अण्णा, बालुसेठ शिरसाठ, अरविंद केनकर, मनोज अग्रवाल, कैलास भडेच, संकेत टेंभिकर, सचिव वनिता साबळे यांच्यासह बाजार समितीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page