असोला बु येथील डेंगू साथीला जलस्वराज पाणीपुरवठा जबाबदार सामाजिक कार्यकर्ते राजु चव्हाण.
चिखली ( आपलं बुलढाणा जिल्हा बातमी) – चिखली तालुक्यातील असोला बुद्रुक येथे जलस्वराज योजने अंतर्गत लाखो रुपयांचे काम झालेले आहे परंतु जलस्वराज योजनेचे कामे अर्धवट असल्यामुळे सदर गावांमध्ये डेंगू सातीचे रोग पसरण्यास जलस्वराज चा पाणीपुरवठा जबाबदार आहे पाणीपुरवठ्याची विहीर तळ्यात असल्यामुळे त्या ठिकाणी कोणताही कर्मचारी व कोणताही व्यक्ती आज रोजी जाऊ शकत नाही आणि गावामध्ये जी टाकी बांधलेली आहे ती टाकी टाकीला आउटलेट नसल्यामुळे सदर घाण पाणी हे टाकीमध्येच साचून असते आणि त्या टाकीवर जाण्यासाठी जे सीडी लावलेली आहे ती वरती जाते वेळेस सिडी.लपलप करते त्यामुळे कोणीही वर जाऊ शकत नाही आणि जो गेला तो आपला जीव मुठीत घेऊन जातो त्यामुळे सदर टाकी ही धुतल्या जात नाही त्यामुळे गावामध्ये जो पाणीपुरवठा होतो त्यामध्ये ग्रामपंचायत चे कर्मचारी ब्लिचिंग पावडर सुद्धा टाकत नाही त्यामुळे गावामध्ये दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे दिसून येत आहे असोला बु येथे जलस्वराज्य योजन व्यतिरिक्त कोणत्याही योजनेचा पाणीपुरवठा या गावाला होत नाही त्यामुळे संपूर्ण गाव हे जलस्वराज्य पाणीपुरवठा योजनेवरच अवलंबून आहे आणि त्यामध्ये सदर ठेकेदाराने हे अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम केलेले दिसून येत आहे गावामध्ये बऱ्याच ठिकाणी वाल हे खराब झालेले आहे व पाईपलाईन सुद्धा व्यवस्थित केली नसल्याचे दिसून येत आहे असोला बुद्रुक गावांमध्ये डेंगूणे एवढे थैमान घातले होते की अक्षरशः लोक गाव सोडून बाहेर गावी जाण्याच्या मार्गावर आहे त्यातच असोला बुद्रुक येथे प्रशासक असल्यामुळे त्यांनी सुद्धा कोणत्याही प्रकारचे काळजी ने घेतल्यामुळे तेथे डेंगू व साथीचे रोग पसरण्यास वाव मिळत आहे आमचे प्रतिनिधी यांनी सामाजिक कार्यकर्ते राजु चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी भविष्याच्या दृष्टीने आसोल बुद्रुक या गावाची सात रोग विषयी चिंता व्यक्त केली आहे.