करवंड येथे शेतकऱ्यावर अस्वलाने केला हल्ला
चिखली :-आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- सकाळी सहा वाजताच्या दरम्यान आपल्या शेतात राबत असतांना करवंड येथील सुनील दलासिंग चव्हाण या शेतकऱ्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला केल्याने गंभीर जखमी तरूण शेतकऱ्याला अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की करवंड येथील शेतकरी सुनील दलासींग चव्हाण हा शेतकरी दिवसा वीज उपलब्ध नसल्याने गहू पेरणीसाठी शेत भिजवायला रात्री शेतात मुक्कामी होता, रात्रभर शेत भिजवून सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घराकडे येत असतांना मादा अस्वलने प्राणघातक हल्ला चढविल्याने गंभीर जखमी झाल्याने अकोला येथे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.
ज्ञानगंगा अभयारण्य व विद्युत महावितरण जोडगोळी ने शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे थांबवावे.एक दिवसा लाईन बंद ठेवून शेतकऱ्यांना रात्री शेतात जाण्यास भाग पाडतो तर वन्य-जीव विभाग जीव घेतो.
करवंड हे गाव ज्ञानगंगा अभयारण्याला लागून असल्याने व बहुसंख्य शेतकऱ्यांची शेती जंगलाला लागूनच आहे. अभयारण्याला सुरक्षा भिंत, तार कुंपण नसल्याने ज्ञानगंगा अभयारण्यातील हिंस्र प्राणी अन्न पाण्याच्या शोधात गावाकडे येतात त्यामुळे हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले असून यामुळे दर वर्षी काहींना अपंगत्व तर काहींना जीव गमवावा लागतो. महावितरण दिवसा लाईन बंद करून रात्री देत असल्याने महावितरण हे शेतकऱ्यांना अप्रत्यक्षपणे हिंस्त्र प्राण्यांच्या तावडीत देत आहे तर अभयारण्याला कुंपण नसल्याने प्राणी प्राणघातक हल्ला करतात.
विद्युत महावितरण कंपनीने अभयारण्य परिसरातील गावांना दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी व वन्य जीव विभागाने लवकरच अभयारण्याच्या सीमेवर तार कुंपण घालावे.