Homeबुलढाणा (घाटावर)बुलढाणा घाटाखाली

अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असोला आणि मेरा खु येथे चोक बंदोबस्तात पार पडली ग्रामपंचायत निवडणूक

असोला बुद्रुक येथे बोगस मतदान झाल्याचे सरपंच पदाचे उमेदवार सौ म्हस्के यांचा आरोप

Spread the love


चिखली :-आपलं बुलढाणा जिल्‍हा बातमी- चिखली तालुक्यातील मौजे असोला बुद्रुक व मेरा खुर्द येथे ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणूक झाली त्या मध्ये मेरा खुर्द येथील सरपंच पदाचे तीन उमेदवार तर एक ग्रामपंचायत सदस्य यांची निवडणूक झाली त्या मध्ये वार्ड नंबर एक मध्ये 73.70% मतदान झाले तर वार्ड नंबर दोन मध्ये 74.82% तर वार्ड नंबर तीन मध्ये 72.80%टक्के वार्ड नंबर चार मध्ये 73.45% मतदान झाले आहे मेरा खुर्द येथे एकुण मतदान 3019 आहे तर त्यामध्ये महिला 1462तर पुरुष 1617 आहे मेरा खुर्द येथे अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार येथे घडला नाही तर असोला येथे एकूण मतदान हे 1307 होते तर असोला बुद्रुक येथील मतदार यादी मध्ये सुरुवातीपासूनच घोळ झाल्याचे दिसून आले होते तेथील दहा लोक हे जिवंत असताना सुद्धा मतदार यादी मध्ये मयत दाखवले होते व मयत जिवंत झाले होते त्याचा फटका शेवटी इलेक्शनच्या दिवशी दिसून आला तर मतदान यादी मध्ये 9 लोकांची नावे हे क्रॉस मारून आले होते याबाबत चिखली तहसीलचे तहसीलदार श्री सुरेशजी कव्हळे यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला असतात त्यांनी थोड्याच वेळामध्ये आमची टीम असोला बुद्रुक येथे येईल आणि जे नऊ लोक मतदानापासून वंचित आहे त्यांना मतदान करण्याच्या जी प्रोसिजर आहेत त्या त्यांच्याकडून करून घेण्यात येईल व त्यांना मतदान करण्यात येईल अशी माहिती दूरध्वनी वरून चिखली तहसीलचे तहसीलदार श्री सुरेश जी कव्हळे साहेब यांनी दिली व चार वाजेच्या टाईमास
चिखली महसूल ची टीम असोला बुद्रुक येथे येऊन त्यांनी ज्या लोकांच्या नावावर क्रॉस मारलेला होता त्यांचे मतदान निवडणूक आयोगाच्या नियमानुसार करण्याचा अधिकार त्यांना देण्यात आला त्यामुळे त्यांचे मनाची भीती होती की आपले मतदान होणार नाही ते चिखली तहसीलचे तहसीलदार यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे त्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे सदर घटना ही मतदार यादीतील घोळामुळे झाल्याचे दिसून येत आहे. असोला बुद्रुक येथे 5 वाजता वॉर्ड नंबर एकमध्ये 94% मतदान झाले होते तर वॉर्ड नंबर दोन 84.84% तर वॉर्ड नंबर तीन मध्ये ८० % मतदान झाले होते.तर सरपंच पदाच्या लढतीमध्ये सौ चव्हाण आणि सौ मस्के हे दोन उमेदवार थेट जनतेतून सरपंच पदाच्या शर्यती होते परंतु वार्ड नंबर एक मधील काही मतदान बोगस झाल्याचा आरोप सौ म्हस्के यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलून दाखवले आहे सदर प्रकरण हे निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे वृत्त लिहिण्यापर्यंत कोणत्याही प्रकारची लेखी तक्रार दिलेली नव्हती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page