शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
खामगाव :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- कर्जबाजारीपणामुळे ७३ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील कदमापूर येथे २३ मे रोजी उघडकीस आली. नारायण मुकाजी गुरव यांनी २३ मे रोजी पहाटे घरासमोर टिनपत्राच्या लाकडाला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केली.
काही वेळाने ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. नारायण गुरव यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली. गुरव यांच्या शेतीवर असलेल्या कर्जाचे हप्ते थकबाकी असल्याने नवीन पीककर्ज मिळणार नाही, आगामी खरीप हंगामात पेरणी कशी करावी, कर्ज कसे फेडावे, अशा चिंतेतून त्यांनी गळफास घेतल्याचे त्यांच्या नावाइकांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड काँस्टेबल गणेश जाधव हे करीत आहेत.