बुलढाणा शहरात सुटला सुसाट वाहनांचा पोळा….
कुठलीही पार्किंगची व्यवस्था नाही ! त्यामुळे कुठेही वाहने उभे राहतात

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:- दिवसेंदिवस बुलढाणा शहरात वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढत आहे शहरातील प्रमुख चौकात तर वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. वाहने उभी करण्यासाठी पार्किंग व्यवस्था नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणात भरगच्च गर्दी वाढत आहे. असे म्हणतात शहरातील रस्ते बंद झाले तर गावाचा विकास होतो मात्र शहरात प्रत्येक रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले जात आहे अगोदरच अरुंद असलेले रस्ते आणखी अरुंद केले जातात मात्र अतिक्रमण जसे आहे तसेच राहते. बुलढाणा शहरातील कारंजा चौक संगम चौक जस्तंभ चौक त्रिशरण चौक यासह इतर चौकात मोठ्या प्रमाणात मोठे वाहनासह छोटे वाहन भर रस्त्यात उभे करण्यात येत आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे
बुलढाणा शहरात सध्या वाहनांची प्रचंड वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच शहरातील सर्वात मोठी समस्या ती म्हणजे सिग्नल नसल्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी होत आहे अपघात होण्याची प्रमाण सुद्धा वाढले आहे. सिग्नल नसल्यामुळे वाहनांना शिस्त नाही त्यामुळे कोणीही कुठून वाहन टाकते त्यामुळे अपघात होताना दिसून येत आहे. यासह बुलढाणा शहरातील हॉस्पिटल लाईन म्हणजेच जांभरुण रोड या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ दिसून येत आहे प्रशासनाने सदर गंभीर घटनेकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
आज बघा काय झाले…
बुलढाणा शहरातील तहसील चौक ते ICICI बँकेपर्यंत तब्बल 45 मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. ॲम्बुलन्स ही चक्क वीस मिनिटे अडकून पडली होती. शारदा ज्ञानपीठ व भारत विद्यालय यांची एकाच वेळेस शाळा सुटत असल्याने रविवार वगळता रोजच वाहतूक ची कोंडी होत आहे. विद्यार्थ्यांना घ्यायला आलेले ऑटो गाड्या रस्त्यावर उभ्या असतात त्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होते.18 वर्षाखालील विद्यार्थी शाळेत आणतात टू व्हीलर बाइक्स