आक्रोश मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील व्हा- लखन गाडेकर

बुलढाणा:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी: शेतकऱ्यांच्या दृष्टीने केवळ घोषणाबाजी करणारे सरकार म्हणजे शिंदे -फडणवीस सरकार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा असो की युवकांच्या रोजगाराचा आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात दिनांक २३ सप्टेंबर २०४ रोजी बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने सामील होण्याच आवाहन तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले आहे. मोताळा तालुक्यात सर्व गावांमध्ये मशाल यात्रेच्या माध्यमातून आक्रोश मोर्चासाठी जागर करण्यात आला. या यात्रेला मोताळा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर काल – परवापासून ही यात्रा बुलढाणा तालुक्यात गाव टू गाव जात आहे. तालुकाप्रमुख लखन गाडेकर यांनी केलेल्या नियोजनात यात्रेला मोठा प्रतिसाद बुलढाणा तालुक्यातही मिळत आहे. यावेळी झालेल्या सभेत लखन गाडेकर म्हणाले की, पीक विम्याचे मागच्या वर्षीचे पैसे अद्याप मिळालेले नाही. शेतकरी मायबापांशी सरकारला काहीही सोयरसुतक नाही. योजनांच्या घोषणाबाजी मध्ये हे सरकार गुंतले आहे. राज्य सरकारच्या तिजोरीत ठणठणात असताना केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडके बहीण, भाऊ यांना आठवतात. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत मात्र उदासीनता आहे. त्यामुळे आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात काढण्यात येणाऱ्या आक्रोश मोर्चामध्ये शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अस आवाहन लखन गाडेकर यांनी केले.
यावेळी संदिप शेळके, तालुका प्रमुख लखन गाडेकर, युवसेना उपजिल्हा प्रमुख डॉ अरुण पोफळे, कि से उप जिल्हा प्रमुख गजानन उबरहंडे, कि से ता प्र अशोक गव्हाणे, बाजार समिती संचालक संजय दर्डा, राजु मुळे, हरिदास सिनकर, युवासेना ता प्र संजय शिंदे, उप ता प्र विजय इतवारे, ओमप्रकाश नाटेकर, सुनील गवते, संजय गवळी, गणेश पालकर, एकनाथ कोरडे, बबन खरे, शाम खडके, मोहम्मद सोफियान, राहुल जाधव, मोहन निमरोट, राजु राजगुरे, पांडुरंग काळे, शेषराव सावळे, समाधान बुधवत, रवी गोरे, सुधाकर आघाव, दिलीप सिनकर, संभाजी देशमुख, अनिकेत गवळी, मधुकर महाले, दिपक पिंपळे, श्रावण बोरकर, रामु राजपूत, अनिल राणा, रामेश्वर बुधवत, बाळासाहेब सिनकर, अवि शिंदे, कृष्णा नरोटे, भगवान आगळे, वामन पा नरोटे, भगवान नरोटे, दिलीप राजपूत, सुनील दळवी, दादाराव भिंगारे, विजय गायकी, रवी पवार, अनिकेत गवळी, योगेश गायकवाड, सुरेश गायकवाड, अजय गायकवाड, रवी राजपूत, साहेबराव इतवारे, वसंता सुरडकर, सुनील गुंडकर, अमोल जुमडे, दगडू शेळके, विजय डुकरे, गोपाल जाधव, दत्ता पवार, संतोष राजपूत, विष्णू राजपूत, रामभाऊ पवार, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.