Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

हवा बदलली… आता नारीशक्ती परिवर्तन घडवणार : डॉ. ऋतुजा चव्हाण

Spread the love

मेहकर:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी- देशाच्या इतिहासात महिलांनी आपल्या कर्तृत्वाने वेळोवेळी राजकीय आयाम बदलेले आहेत. आज सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला आपले कर्तृत्व गाजवताना दिसून येत आहेत. आणि बदल घडविण्याची ताकद सुद्धा महिलांमध्येच आहे. त्याचं अनुषंगाने आज मेहकर लोणार मतदारसंघात आता राजकीय हवा बदललेली आहे. कारण हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर आहे. येथील जनतेचा विकास झालेला नाही. वाढती महागाई, गॅस सिलिंडरचे दररोज बदलणारे भाव, गोडेतेल, साखर, दाळ, वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे महिला जनतेच्या मनात या सत्ताधारी लोकप्रतिनिधी बदल संपूर्ण मतदारसंघात नाराजीचा सूर उमटलेला आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेचा, नारीशक्तीचा आशीर्वाद माझ्यासोबत असल्यामुळे मेहकर मतदारसंघात विधानसभा निवडणुक लढविण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. आता नारीशक्तीच परिवर्तन घडवणार आहे असे प्रतिक्रिया डॉ. ऋतुजा ऋषांक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिल्या आहेत. डॉ. ऋतुजा चव्हाण पूढे बोलताना म्हणाल्या की, गेल्या अनेक वर्षांपासून मेहकर-लोणार मतदारसंघाचा पाहिजे तसा विकास झालेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page