सर्वसामान्य जनता परिवर्तन घडवणार : डॉ. ऋतुजा चव्हाण

डोणगांव:- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी-आज राज्यात नेमकं काय चालले काही समजायला मेळ नाही. राजकीय घडामोडी पाहता राजकारणाचा चिखल झाला आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चालू असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे आता यांच्या राजकारणाला सर्वसामान्य जनता कंटाळलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आता बदल करायचा आहे. त्यामुळे मेहकर मतदारसंघात आता परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. यासाठी सर्वांनी एकजुटीने सोबत चला अशा प्रतिक्रिया डॉ. ऋतुजा चव्हाण यांनी गावभेटी दरम्यान जनतेशी संवाद साधताना बोलत होत्या.
आज वाढत्या महागाईच्या समस्या मेहकर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावत आहेत. सोबतच विविध समस्या पाहता, सर्वसामान्य जनतेपर्यंत विकासाची गंगोत्री मतदारसंघात पोहोचलीच नाही. विकासापासुन दूर असलेल्या मेहकर मतदारसंघात केवळ विकासात्मक घोषणाचा पाऊसचं पडत असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनातच परिवर्तन घडविण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत मेहकर -लोणार मतदारसंघात सर्वसामान्य जनता परिवर्तन घडवणार आहे. असे डॉ. ऋतुजा चव्हाण जनतेशी संवाद साधताना गावभेटी दरम्यान बोलत होत्या.
निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतातील पिकाची होत असलेली नुकसान, त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर, पिकविमा, वाढती महागाई, त्यात जीवनावश्यक वस्तुचे भाव गगणाला भिडलेले आहेत. पेट्रोल-डीजल, घरगुती गॅस, वीजदरवाढ सातत्याने वाढत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिक हैरान झालेला आहे. त्यातच गावागावात आरोग्य सुविधा, पाण्याचा प्रश्न, स्वच्छता, रस्ता,घरकुल, अशा विविध समस्यांनी प्रत्येक नागरिक हताश झालेला आहे. तरीही सर्वसामान्य हिताशी या सत्ताधाऱ्यांना काहीही सोयरसुतक नसल्याने, महागाईच्या चक्रात सर्वसामान्य नागरिक पिळून आणि पिचून निघत असल्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणूकीत मेहकर मतदारसंघात सर्वसामान्य जनता परिवर्तन घडवणार आहे. अशा डॉ. ऋतुजा चव्हाण शेतकरी बांधवासोबत संवाद चर्चा करतानी आपले मत व्यक्त केले आहे.