Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

विमाकंपन्यांनी शेतकऱ्यांची हेळसांड थांबवावी : डॉ. ज्ञानेश्वर टाले

Spread the love

 

डोणगांव- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी:-मेहकर- लोणार मतदारसंघात पिक विमा योजने संदर्भात शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे उभ्या पिकांची नासाडी होत आहे. तरीही विमा कंपनीकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम मिळवून देईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, आता शेतकऱ्यांची हेळसांड थांबवा असे शेतकरीनेते डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी उकळी-सुकऴी येथील शेतकऱ्यांच्या मेळाव्यात यांनी दिली.

मेहकर मतदारसंघातील उकळी-सुकळी येथे पिकविमा तक्रारी संदर्भात शेतकऱ्यांच्या आढावा बैठक घेताना ते बोलत होते. यावेळी बैठकीला ऋषांक चव्हाण यांच्यासह दशरथ बोरे, गोपाल मंजुळकर, मोहन नवले, सिद्धू बोरे,सह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी डॉ. ज्ञानेश्वर टाले व ऋषांक चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यावेळी ते बोलत होते. या आढावा बैठकीत परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.

शेतकऱ्यांची थट्टा खपवून घेतली जाणार नाही : ऋषांक चव्हाण

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरीनेते रविकांत तुपकर व डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्या नेतृत्वामध्ये डॉ. ऋतुजा चव्हाण सातत्याने लढा देत आहेत.
आज विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिकविमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप दिसत आहे. या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम डॉ. ऋतुजा चव्हाण करीत आहेत. विमा कंपन्यांनी उर्वरित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पिकविमा द्यावा आणि द्यावाचं लागले, विमा कंपन्यांकडून चाललेली शेतकऱ्यांची थट्टा आम्ही कदापि शेतकऱ्यांवरचा अन्याय सहन करणार नाही. असा निर्वाणीचा इशारा विमा कंपन्यांना ऋषांक चव्हाण यांनी दिला आहे. विनाकारण विमा कंपन्यांकडून होणारी शेतकऱ्यांची थट्टा आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी बोलताना ऋषांक चव्हाण यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page