राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय, बुलडाणा येथे राष्ट्रीय टेक्निकल इव्हेंट टेक व्हिजन २०२५ चे आयोजन संपन्न…

बुलढाणा :- आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :- द्वारका बहुउद्देशीय ग्रामीण विकास फाउंडेशन द्वारा संचालित, राजर्षी शाहू अभियांत्रिकी बुलडाणा येथे प्रत्येकवर्षी विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला चालना व सादरीकरण प्लॅटफॉर्म देण्याच्या उद्देशाने, द्वारका फाउंडेशनचे अध्यक्ष श्री धृपतरावजी सावळे साहेब व सचिव सौ.कीर्तिताई पऱ्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली TECH VISION इन्व्हेंट चे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा ०४ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय स्थराचा टेकनिकल इव्हेंट – TECH VISION-२०२५ राजर्षी शाहू अभियांत्रिकी बुलडाणा येथे आयोजित करण्यात आले होते.
या इव्हेंट मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन तसेच अभियांत्रिकी व इतर शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेसेंटशन, कुविझ, रोबो रेस, ब्रिज मेकिंग, तसेच विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी बॉक्स क्रिकेट, स्लोव सायकलिंग, टग ऑफ वॉर, स्पॉट फोटोग्राफी इत्यादी ९ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख अथिति उदघाटक म्हणून पोदार इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य श्री. अजय इंगळे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध दंत चिकीत्सक डॉ. समीरजी प-हाड उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात ही दीपप्रजलन व प्रतिमेशपूजन करून करण्यात आली. या टेक्निकल इव्हेंट टेक व्हिजन २०२५ प्रास्ताविक व प्रमुख अतिथींचा परिचय कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. एम. एम. खान यांनी केले व आयोजनाचा उद्देश समजून सांगितला. या इव्हेंट मध्ये शहरातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय, तसेच तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालयातील साडेचारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उदघाटक प्राचार्य श्री. अजय इंगळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्दर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात टेकनॉलॉजी मुळे झालेल्या आमूलाग्र प्रगतीने मानवी जीवन किती सुखकर केले हे उदाहरणाच्या दाखल्यांसह संजूवन व पटवून दिले. तसेच नवीन तंत्रज्ञानामुळे होणारे फायदे आणि नुकसान यावर विविध उदाहरणे देऊन प्रकाश टाकला. नवीन तंत्रज्ञान विकसित करणे तसेच ते योग्यरीत्या वापरने हि काळाची गरज आहे आणि ह्यासाठी राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनीरिंग सतत कार्यरत असते, त्यासाठी त्यांनी महाविद्यालयाचे कौतुकही केले. तसेच अध्यक्षीय भाषणात डॉ. समीरजी पऱ्हाड यांनी मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी जीवनामध्ये चौकस विज्ञाननिस्ट दृष्टीकोन किती महत्वाचा आहे हे विविध उदाहरणांच्या माध्यमातून समजून सांगितले. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपले जीवन सोपे, अधिक आरामदायी आणि अधिक आनंददायी झाले आहे. हे कार्य पूर्ण करण्यासाठी लागणारा प्रयत्न आणि वेळ कमी करते, त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढते असे सांगितले. त्यामध्ये त्यांनी तरुणांनाचे योगदान किती सर्वात महत्वाचे आहे हे सांगितले. तरुणांच्या शक्ती लायोग्य दिशा व एक्सपोजर देण्याची गरज आहे तशा प्रकारचा प्रयत्न आशा
प्रकारच्या कार्यक्क्रमांच्या आयोजनाच्या माध्यमातून संपूर्ण स्थरावर होणे गरजेचे आहे. असे सांगितले. याप्रसंगी मंचावर सौ.कीर्तिताई पऱ्हाड, प्रा. बी. व्ही, नरवाडे, प्रा. पी. एस. राणे तसेच या कर्यक्रमचे समन्वयक प्रा.एम. एम. खान उपस्थित होते. इस्पर्धे संपल्यानंतर बक्षीस वितरण सोहळा चालू झाला या वेळी सौ. कीर्तिताई पऱ्हाड मॅम यांनी आपल्या भाषणात प्रमाण पत्र व बक्षीस चे विद्यार्थी जिवनात किती महत्व असते याचा उल्लेख केला. स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व रोक स्वरूपात बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार व गौरव करून त्यांना प्रेरित करण्यात आले. याकार्यक्रमचे सूत्र संचालन कु. ऋतुजा मते व कु. आर्या पाटील तर आभार प्रदर्शन प्रा. पी. एस. काटकर यांनी केले.
या प्रसंगी सोहळ्यासाठी प्रा. एन. एस. पायघन, प्रा. पी.ए.राणे, प्रा. ए.जी कुहिरे, प्रा.आर.बी. मोले प्रा. भालेराव, प्रा. चोपडे, प्रा. सुरडकर प्रा. देशपांडे, प्रा. पिंपळे, प्रा. पल्लवी राणे, प्रा.सरोदे,, प्रा. चौधरी, प्रा. इंगळे, प्रा. रसाळ, प्रा. लाहोटी, प्रा. पोपळघाट, प्रा. गाडेकर, प्रा.ढोके, प्रा. जाधव, प्रा. दांडगे,प्रा. नयन इंगळे, तसेच श्री. विशाल शिंदे, श्री देवकर, श्री. सिरसाट, श्री. पवार, श्री. नेमाडे, श्री. जमदाडे, श्री. ठोंबरे, श्री लड़के, श्री. प्राणे, सौ. सरकटे, श्री गवई, श्री, धोटे, श्री मांडवे, श्री. काकडे, श्री. चिटवार, श्री. खोलगडे, श्री. मुळ इत पादी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्याथ्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.