महिला, बालके, युवक, गरीब,शेतकरी व व्यापारी तसेच वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करुन बनवलेला अर्थसंकल्प…आमदार सौ श्वेताताई महाले.

चिखली – आपलं बुलढाणा जिल्हा बातमी :-राज्याचे अर्थमंत्री श्री अजित पवार यांनी आज विधानसभेमध्ये आपला 11वा अर्थसंकल्प्प सादर केला.महायुती सरकारचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी अतिशय सकारात्मक व समाजातील सर्व घटकांना यथायोग्य न्याय मिळेल असेच निर्णय मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आपल्या अर्थसंकल्पात घेतल्याचे दिसून येत असून महिला, बालके, युवक, गरीब व वंचित घटकांवर लक्ष केंद्रित करुन त्यांच्यासाठी अन्न सुरक्षा, निवारा, पिण्याचे शुध्द पाणी, आरोग्यसेवा, शिक्षण सुविधा आणि रोजगार-स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन, त्याद्वारे सर्वसामान्य माणसांच्या जीवनात गुणात्मक बदल घडविण्यासाठी राज्यात लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.अशी प्रतिक्रिया चिखली विधानसभेच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी दिली आहे.
लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, केली विकासाची कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो.. पुन्हा आलो.. असे म्हणत लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आल्याचं अजित पवार यांनी सूचवलं.त्यांचे हे संबोधन हिच महायुती सरकारची लाडक्या बहिणींच्या प्रती असलेली कृतज्ञता असल्याचे सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
राज्य सरकारचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन कार्यक्षम होईल यात शंका नाही. राज्याचे नवीन औद्योगिक धोरण जाहीर होणार असून त्याद्वारे 50 लाख नोकऱ्यांचा उद्देश सरकारच्या समोर असेल.हा माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसंच्या स्वच्छ व पारदर्शक प्रशासन आणि उद्योग आधारे रोजगार निर्मिती या ध्येयाशी सुसंगत निर्णय असून महायुती सरकारची प्राथमिकता असल्याचे सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत 7.5 अश्वशक्ती पर्यंतच्या 45 लक्ष कृषी पंपांना मोफत वीज पुरविण्यात येत आहे. डिसेंबर, 2024 अखेर 7 हजार 978 कोटी रूपयांची वीज सवलत या योजनेव्दारे देण्यात आली आहे.त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिवसा वीज कृषी क्षेत्रातील 16 हजार मेगावॅट विजेची मागणी हरित ऊर्जेतून पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शेतकऱ्यांना दिवसा विश्वासार्ह वीज पुरवठा करणे शक्य व्हावे, यासाठी २७ जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधून २ हजार ७७९ विद्युत उपकेंद्रांसाठी सौर प्रकल्प हाती घेण्यात आले असून ते ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहेत.
त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा हाच महायुती सरकारच्या धोरणाचा प्रमुख केंद्रबिंदू असल्याचे दिसून येत असल्याबद्दल सौ. श्वेताताई महाले यांनी सांगितले.
शासनाने महत्वाकांक्षी तापी महापुनर्भरण हा 19 हजार 300 कोटी रुपये किंमतीचा सिंचन प्रकल्प हाती घेण्याचे ठरविले आहे – या प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भातील खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे.
राज्यातील प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन व परिसर विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. महानुभव पंथाच्या श्रध्दास्थानांच्या विकासाची कामे हाती घेण्यात येणार आहेत.त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील जाळीचा देव तसेच अनेक महानुभाव संप्रदायाच्या ठिकाणांना चांगला निधी पुरवता येईल असे सौ. श्वेताताई महाले म्हणाल्या.