Homeबुलढाणा (घाटाखाली)बुलढाणा (घाटावर)

पाकीस्तानसह पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवादी तळ उध्वस्थ करुन “ऑपरेशन सिंदुर” यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्य दलाचं अभिनंदन…

देशवासीयांची एकजूट, राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्य दलाने केलेल्या गगनभेदी कारवाईतुन "ऑपरेशन सिंदुर" यशस्वी झाल्याची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांची प्रतिक्रीया

Spread the love

बुलढाणा (आपलं बुलढाणा जिल्हा बातमी):- पहेलगाम येथिल पर्यटकांवर दहशतवादयांनी केलेल्या हल्ल्याचा बदला आज सकाळी भारतीय सैन्यांनी “ऑपरेशन सिंदुर” राबवत पाकीस्तानसह पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करुन दहशतवादयांच कंबरडे मोडण्याच काम केल या “ऑपरेशन सिंदुर” मध्ये सहभागी झालेल्या सर्व सैन्यांच अभिनंदन करत देशवासीयांची एकजूट राजकीय इच्छाशक्तती, आणि सैन्याने केलेली गगनभेदी कारवाईतुनच “ऑपरेशन सिंदुर” यशस्वी झाल्याची प्रतिक्रीया केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केली.

22 एप्रिल रोजी जम्मू काश्मिरातील पहेलगाम येथिल भारतीय पर्यटकांना लक्ष करत दहशतवादयांनी त्यांचा धर्म विचारुन त्यांची हत्या केली या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या हल्ल्यानंतर पर्यटक भयभीत झालेले असतांना त्यांना आधार देण्यासाठी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब स्वत: जम्मू काश्मिरला आले. आपणसुध्दा पर्यटकांच्या मदतीला धावुन गेलो त्यावेळी प्रत्येक भारतीयांची भावना या हल्ल्याचा बदला घेण्याची होती. त्याचवेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्यातील दहशतवादयांना चोख प्रत्युत्तर देवुन दहशतवादयांचे कंबरडे मोडण्याचे सुतोवाच केले होते त्यानुसार सैन्यांनी केलेल्या नियोजनांनंतर 7 मे च्या पहाटे पाकीस्तानसह पाकव्याप्त काश्मिरमधील 9 दहशतवादी तळ नष्ट करण्यात आले.

“ऑपरेशन सिंदुर” मध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच अभिनंदन करत भारतीय सैन्यांच्या क्षमतेवर देशवासीयांना पुर्ण विश्वास आहे. संपुर्ण देशवासीयांची एकजूट त्यांच्या पाठीमागे उभी आहे राजकीय इच्छाशक्ती आणि सैन्यदलाच्या गगनभेदी कारवाईतुनच “ऑपरेशन सिंदुर” यशस्वी झाले आहे. भारतीय वायुसेना, नौसेना आणि स्थलसेना नेतृत्वाचा सहभाग मोठा असुन ही कारवाई देशाच्या सीमेपलीकडे जाऊन दहशतवादयांचे कंबरडे मोडणारी आहे. अशा कारवायांसाठी राजकीय इच्छाशक्ती ही महत्वपुर्ण आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाने “ऑपरेशन” सिंदुरच्या माध्यमातुन हे दाखवुन दिले आहे. दहशतवाद बिमोड करण्यासाठी अशा कारवाया सुरुच राहतील असा विश्वासही केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी या वेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

You cannot copy content of this page